Posts

आयुष्यात पैसा खुपच महत्वाचाय..!

Image
  आयुष्यात पैसा खुपच महत्वाचाय..! आज सकाळी मित्राचा कॉल आला, अरे मला खूपच भारी झालंय, लवकर ये...दोन तीन दिवसापासून आजारी असल्याने त्याला उठताही येत नव्हते. मग लागलीच त्याच्या घरी गेलो. झोपलेलाच होता, म्हटला, निघायचं का? आधी थोडस खाऊन घे, लगेच निगु...! गाडीला किक मारली अन निघालो...! पाच दहा मिनिटात दवाखान्यात पोहचलो. साडे दहाची वेळ असल्याने अद्याप कुणी पेशंट नव्हतं, त्यामुळं याला लगेचच इंजेक्शन आणि सलाईन लावलं.  आमच्यानंतर एक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन आत आली. ते मुलं अधून मधून खोकत होतं. त्याला डॉक्टरांनी तपासून वाफ देण्यास सांगितली. सिस्टरने लागलीच त्याला वाफ देत डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे गोळ्या औषधें दिली. बिल झालं होतं दोनशे रुपये ... त्या महिलेने विनवणी करीत डॉक्टरांना पैशासाठी थांबायला सांगितलं..त्या लहान बाळाला चार दिवसांचा कोर्स होता. आजचा तिसरा दिवस होता. त्याच्या आईच्या बोलण्यावरून त्याच्यात फरकही पडला होता. परंतु आजही त्या महिलेकडे देण्यास पैसे नव्हते. गहिवरून आलं. डॉक्टरांनी सांगितलं, एकवेळ तुमच्या पोटाला मारा पण लहान पोरांकड लक्ष देत चला, तुमच्याकड पैसे आले...

शाळेतल आंदोलन

Image
#गुरुपौर्णिमा_निमित्त माध्यमिक आश्रम शाळा रोहिले.  शाळेतल आंदोलन ही २००७ ची गोष्ट आहे. मी नुकताच नववी पास झालो होतो. दहावीचे वर्षे असल्यामुळे शिक्षकांनी मला त्यावर्षी होस्टेलला ठेवले.. नववीपर्यंत अपडाउन करत असल्याने.. तास सुरु झाले होते... दहावीमुळे अभ्यासही सुरू केला होता... एके दिवशी परिपाठ झाल्यानंतर आम्ही सर्व वर्गात गेलो.. सकाळचा नेहमीच गणिताचा तास असायचा... तेवढ्यात अहिरे सर वर्गावर आले.. आणि त्यांनी सांगितले की मी आजपासून तुमचं गणित घेणार आहे... सगळ्यांच्या चेहर् ‍ यावर एकच प्रश्न पडला होता... की  #पाटिल  सर काय शिकवणार म... कारण इयत्ता सहावी त्यांनी आम्हाला गणित शिकवले होते... अन् अचानक हे काय.... तेवढ्यात अहिरे सरांनी आमच्या प्रश्नाच उत्तर दिले... की पाटिल सरांची बदली झाली असुन ते आता दुसर् ‍ या शाळेवर जाणार आहेत.... आम्ही तर काहीच बोलत नव्हतो.... कसतरी तो तास झाला... पण कुणाचच मन लागत नव्हतं.... दुपारची बेल झाली अन् सगळे जेवणाच सोडुन एकमेकांना विचारायला लागल.... 'आपण सरांची बदली थांबवु' पण कशी? लागलीच आम्ही सर्व मुख्याध्यापकांकडे गेलो... त्यांना या...

कॉलेजचे दिवस भाग ३

Image
पत्रकारितेची  दोन वर्षे अन बरच काही ...  बी ए च शेवटच वर्षे पहिल्या क्रमांकाने पास झालो होतो. परंतु पुढे काय ? या विचारात होतो. हॉटेलचा जॉबही सोडला होता, त्यामुळे तिथे परत जाण चुकीच वाटतं होत.. काही दिवसांनी हॉटेलमधील सरांचा फोन आला.. मला तातडीने बोलवलं होत... कुणी सर आले होते हॉटेलला त्यांना भेटायला... कुठेतरी जॉब असेल या हेतुने मी लागलीच ञ्यंबकला गेलो.. ते सर म्हणजे औरंगाबाद विद्यापीठातील नाट्यशास्र विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत खिल्लारे होते... त्यांनी मला जॉब ऐवजी एमए मास मिडिया बद्दल सांगितले... मला तर मास मिडिया काय आहे हे माहीतही नव्हते. काय कराव म्हणून विचार केला... तर नाटकाची सुरवात तर माझी झाली होती मग म्हटलं केटी ला अ‍ॅडमिशन घेतल तर नाटकही करता येईल अन शिक्षणही म्हणून के.टी.एच.एम ला अ‍ॅडमिशन घ्यायच ठरल...अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर सुरवातीचे दिवस आम्ही दोघे तिघेच लेक्चरला असायचो... हळू-हळु बाकीची पलटण यायला सुरुवात झाली. यात अमोल, विजय, कमलेश, वैभव, विकास, अभिजित, निलेश, अझहर, यशवंत ही सगळी मंडळी होती.. यात बाकीचे असे होते की यार हे आतापर्यंत काय करत होते.. यांनी...

कॉलेजचे दिवस भाग -२

Image
नाटकाची सुरवात अन शेवटही ? BA पहील वर्षे नुकतेच पास झालो होतो. दुसर्‍या वर्षीच्या ऍडमिशन ची तयारी चालू होती. पहिल्या वर्षी अपडाउन केल होत. परंतु बस सोय नसल्याने पुढच्या गावापर्यंत पायी याव लागायच. मग माझा मित्र सचिन अंबापुरे हा त्र्यंबकमधील एका प्रशस्त हॉटेल मध्ये कामाला होता.  त्यामुळे  घरच्यांना हातभार लागावा तसेच मलाही खर्चायला पैसे मिळतील म्हणून  मी तिथे जॉईन झालो. आम्ही दोघे एकाच वर्गात असल्याने सकाळी 1 पर्यंत कॉलेज करायचो. मग 3 ते 11 जॉब करायचो. अशातच नाशिकच्या के.टी.एच.एम कॉलेज मध्ये युवा स्पंदनला सुरवात झाली होती. . त्यावेळी मला नाटकाचा न सुद्धा माहित नव्हता.. म्हणजे डीएड असताना सहभाग घेतला होता, पण थोडक्यात...त्रंबक कॉलेजमध्ये पवार सर (विनायक पवार सर) नाटकाच्या प्रॅक्टिस घ्यायचे. मी त्यावेळी फक्त गाणं म्हणायचो. पवार सरांनी मला विचारलं कि नाटकात काम करशील का?  मी म्हटलं बघु प्रयत्न करुन....  मग काय तालमीला सुरवात झाली.  मला पहिल्याच नाटकात लीड रोल मिळाला.. युवास्पंदन ची प्राथमिक फेरी कॉलेज मध्ये होती.. आम्ही नवीन असल्...

कॉलेजचे दिवस भाग - १

Image
                                    डेजची धम्माल अन बरच काही   2014 ला मी BA च्या शेवटच्या वर्षाला होतो. SY ला पहिला आल्यानंतर माझी वर्णी महाविद्यालयात GS म्हणून लागली. त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमात मी व माझे सहकारी सहभागी असायचे. असच एकदा कॉलेज डेजच्या निमित्ताने प्लान करायच ठरवलं. सर्व नियोजन व्यवस्थित पार पडलं. पण शेवटचा कॉलेज डे धडाक्यात साजरा करायचा. अशाप्रकारे चार पाच मित्र जमलो ... उद्याचं नियोजन सुरू होत..... राहुल, उद्या काय करायचं यार... असं मित्राला विचारलं  काहीच सुचत नव्हतं ...  गेल्या  पाच-सहा दिवसापासून महाविद्यालयात होत असलेल्या वेगवेगळ्या डेजनी मुलांचा उत्साह एकदम ओसंडून वाहत होता. मग आमचा विचार झाल्यावर मी सरांना जाऊन भेटलो.  या सर्व गोष्टींसाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते.  त्यांनी सांगितले यापूर्वी  शेवटच्या दिवशी Dj असायचा परंतु यावर्षी मॅडमने सक्त ताकीद दिली आहे कि कोणत्याही परिस्थितीत DJ वाजवायचा नाही.  अन् तसही आम्ही...

संगीतसरताज किशोरीताई

Image
किशोरी आमोणकर किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी मुंबई येथे झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रमुख गायिका म्हणून आजही ओळखल्या जातात त्यानं आदराने गानसरस्वती म्हणून संबोधिले जाते. त्यांना सुरवातीपासूनच संगीताची गायन परंपरा आपल्या आईकडून मिळाली. त्याचप्रमाणे संगीताच्या इतर घराण्यांकडून त्यांना विशेष संगीताचे धडे मिळाले. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये पूर्ण केले. कालांतराने त्यांचा विवाह एका प्राध्यापकांशी झाला. परंतु लवकरच त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी संगीताचा ध्यास सोडला नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली. किशोरी आमोणकरांनी १९५०च्या दरम्यान आपल्या संगीत व्यावसायिक कारकीर्दीस सुरवात  केली . त्यांनी पहिल्या वहिल्या हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' या गीतासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यानंतर १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरी आमोणकर या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्...

पं . विष्णू नारायण भातखंडे

Image
पं . विष्णू नारायण भातखंडे  एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात इंग्रजीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता . त्यावेळी सुद्धा गुरूला विशेष महत्व होते. इतर क्षेत्रापेक्षा संगीत आणि अध्यात्म या क्षेत्राला अनन्य साधारण महत्व होते.परंतु गुरुकुल पद्धतीचा अट्टाहास मागे पडू लागला .गुरुकुल पद्धतीऐवजी इंग्रजी शिक्षणाला महत्व दिले जाऊ लागले. त्याची सावली संगीत क्षेत्रातही पडली . या काळात कौटुंबिक नाते नसतानाही केवळ कलेसंबधीच्या आसक्तीने संगीत शिक्षणाकडे पाहिले जाऊ लागले .या काळातील गुरु -शिष्या संबंधीचे गोड उदाहरण म्हणजेच पं.विषाणू नारायण भातखंडे आणि श्रीकृष्ण नारायण रातंजनकर हे होय.  प.विष्णू नारायण भातखंडे : पंडित विष्णू भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० साली झाला . १८८० साली ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे जाऊन वकिली केली. १९१० पर्यंत वकिलाची नोकरी केली. प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी संगीताची विविध पारितोषिके जिंकली होती. त्यांना बासरी व सतार वादनाची  आवड होती. त्यामुळे घरच्यांनीही भातखंडेना विरोध केला नाही . १८८४ लला भातखंडे मुंबईतील गायनोत्तेजक मंडळीचे सभासद झाले. त्या...